Monday, April 25, 2011

शेवटचा दिस गोड व्हावा - Final day of the tour

"शेवटचा दिस गोड व्हावा " आणि तो तसा झालाही.सकाळी  गरम  गरम तांदळाच्या  पिठाची दिरडी खावून आम्ही थोडीफार खरेदी उरकून ९ पर्यंत गुहागरला bye   bye केला. आज ची सकाळ मळभ घेऊन आली होती . मला भिम पालासिमाधली एक बंदिश आठवली " सावन कि ऋत आई सखी री ". 
बर्याच प्रवासानंतर आम्ही डेरवण ला ( चिपळूण ) पोचलो बस मधला मोठा प्रवास गाण्यांनी , विनोदांनी भरून टाकला. डेरवण मध्ये श्री वालावलकर ह्यांनी  शिव सृष्टीची निर्मिती  केली आहे. ह्यात जवळ जवळ १०० एक , मोठे मोठे घोडेस्वार , भाले  घेतलेले मराठा सैनिक उभे आहेत. प्रवेशद्वारावर २ हत्ती स्वागताला अंबरी सहित उभे होते. आत प्रवेश केल्यावर सभामंडपात श्री छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक बारीक प्रसंग 3d शैली मध्ये कोरलेले आहेत. सभा मंडपाच्या मध्यभागी एक मोठे लोलकाचे झुंबर आहे. 

ह्या शिव सृष्टीच्या मागेच श्री टेंबे स्वामीचा मठ आहे. मठात महिलांना साडी आणि पुरुषांना पूर्ण भारतीय पोशाख असल्याशिवाय आत सोडत नाहीत.इथल्या उपहारगृहात थोडी पोटपूजा करून आम्ही देवी विन्ध्यावासिनीच्या दर्शनासाठी कूच केली. मंदिरातली मूर्ती फारच ८०० वर्षे जुनी असून तिच्या बरोबर कार्तिकेयाची पण मूर्ती आहे. 

कार्तिकेयाचे दर्शन महिलांना निषिद्ध असले तरी इथे विनंती  केल्यास कार्तीकेयांचे दर्शन होऊ शकते. 
दर्शन घेऊन आम्ही गोवाल गड कडे निघालो. ह्या गडाच्या पायथ्याशी करंजे श्वरी  देवीचे मंदिर आहे मंदिराच्या मुख्य गाभार्यात ला देवीचा लाकडी देव्हारा फारच सुबक आहे. 

ह्या मंदिराच्या पुढून गोवाल गडावर चढण्याचा मार्ग आहे, डोंगरात कोरलेल्या पाय र्या आहेत. वर चढून गेल असता मागे दिसणारी वशिष्टी नदी आणि तिच्या पत्रातून घराकडे परतणाऱ्या कोळी लोकांच्या होड्या हे दृष्य वीलोभानीय दिसते. परत उतरून आम्ही दुपारचे जेवण घेण्या साठी  एका हॉटेल वर थांबलो पण शुद्ध शाकाहारी भोजन शोधण्यासाठी थोडे जास्त कष्ट पडले. पण एकदाचे हॉटेल विरंगुळा मिळाले. इथे तर अवीट गोडीची पानीर  कोल्हापुरी , पनीर पालक आणि ७२ वर्ष्याच्या आजीनी केलेल्या गरम गरम पोळ्या आणि वर ताजे ताजे ताक ह्यांनी आमचा आत्माराम तृप्त झाला. 

इथे ह्या नर्सरी मध्ये कृष्णकमळ पाहायला  मिळाले ( लाल, जांभळ्या रंगाची २ फुले देणारे २ वेल होते.) 
संध्याकाळी आम्ही महाड च्या जवळ चहा पान करण्यासाठी उतरलो त्या ढाब्याच्या मागे सुंदर सूर्यास्ता चा देखावा होता. तिथे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाबरोबर उभारून येणारे मावळतीचे रंग आम्ही आमच्या कॅमेर्यात टिपून घेतलेत.

कशेळी घाटा पासून पोलादपूर फाट्यापर्यंत रस्ते वळवाच्या पावसाची पावती देत होते. मृद गंध मनाला वेड लावत होता. कडू गोड आठवणीची साठवण गंधा बरोबर घरापर्यंत पोचली. 

प्रवास सुखरूप करणाऱ्या आमच्या गाडीवान दादांचे आभार. आमच्या ग्रुप लीडर चे पण कौतुक  करावे तितके थोडेच आहे.त्यांना धन्यवाद.


समाप्त :-
शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे

दक्षिण गुहागर - दुसरा दिवस

दुस रया दिवसाची सुरुवात परत किलबिलाटाने सुरु झाली, आज न्याहारी साठी मस्त गरम गरम पोहे होते. मस्तच आवडता मराठमोळा पदार्थ. जवळ जवळ ९ वाजता आम्ही कूच केली ते तवसाळ च्या समुद्र किनार् या  कडे. 
तासदीड तासाने आम्ही एका पठारा वर पोचलो तिथून दिसणारा विस्तीर्ण सागर नजरेत मावत नव्हता. खाली सागर किनार् या कडे जाण्याचा रस्ता होता. 
तिथून निघून सुरुच्या बनातून चालत आम्ही सागर तीरा पाशी निघालो वाटेत उंच च्या उंच सुरु वर बसलेली घार दिसली. सुरुच्या छायेत मस्त गारवा जाणवत होता.२ मिनिटात आम्ही किनार्या वर पोचलो.  सुंदर स्वच्छ लोभस सागर लाटां फेसाळत येत होत्या इथे परत मस्त पाय बुडवून फिरलो.सागर किनार् या  च्या एका बाजूला पोलाद निर्माण करणारी जिंदाल लिमिटेड होती तर दुसऱ्या बाजुने जुना विजयगड आपले अस्तित्व टिकवून उभा होता.

पुढे  आम्ही हेदवी गणेश मंदिरात गेलो.शुभ्र संगमरवराची गणेशाची सुबक मूर्ती आणि मंदिराचा गाभारा विलोभानिंय आहे. मंदिराच्या पाठीमागे मंदार वृक्ष आहे . ह्याची फुले गणेशाला फार प्रिय आहेत. जवळच एक छोटे दुकान होते ज्यात चवदार पन्हे मिळत होते. मंदिराच्या परिसरात राताम्ब्याचे वृक्ष आहेत.  इथून १० मिनिटात हेदवी च्या आणखीन एका सागर किनार्या कडे पोचलो. तिथे बामन घळ नावाची निसर्ग निर्मित पोकळी आहे. समुद्रातील उंच लाटां हिच्या निर्मितीला कारणीभूत आहेत. जेंव्हा लाटेचे पाणी ह्या छोट्या पोकळीतून वरती उडते तेंव्हाची मजा औरच. असे म्हणतात कि ह्या घळीमध्ये एक ब्राम्हण पडून मेला होता त्यामुळे हिचे नाव "बामन घळ".

आता पोटात कावळे काव काव करायाल लागले होते म्हणून आम्ही  वेळणेश्वर मंदिराच्या जवळ गोखल्यांच्या कडे जेवण घेतले. लाडू फारच छान होता. एकूणच मर्यादित थाळी प्रकारात मोडणारा प्रकार छान झाला.थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पालशेत च्या गुहे कडे निघालो.

पालशेत ची गुहा हि एका नदीच्या किनार् या वर नैसर्गिक रित्या तयार झाली आहे. ह्या गुहेत ९०००० वर्ष्यांपूर्वी माणूस वापरत असेलल्या दगडी हत्यारांचे नमुने मिळाले (आता ते सरकारच्या पुरातातव विभाग कडे असतात)  ह्या गुहे चा रस्ता एका ओसाड पठारावरून नदीच्या कोरड्या पत्राकडे जातो. इथे वाटेवरच करवंदाची भरपूर जाळी आहेत. रानमेवा खाण्याचा मोह आवरता नाही आला. 
गुहेकडे जाण्याचा रस्ता फारच खडतर आहे नदीच्या पात्रातले मोठे मोठे दगड पार करत गुहेपाशी पोचता येते. इथून निघायला जवळ जवळ संध्याकाळ झाली होती. सूर्यास्त पाहण्यासाठी परत आकडा सगळेजण गुहागरच्या समुद्र किनार् या कडे गेलो. मला मात्र एका खंड्याने (किंगफिशर)व्याडेश्वराच्या मंदिरापाशीच घुटमळत ठेवले. मी पोचे पर्यंत सूर्य असतास गेला होता काही चौपाटी style फोटो काढून आम्ही परत मुक्कामी परत आलो. 
रात्री मराठ मोळ जेवण ( भात ,आमटी, पोळी भाजी ) जेवून  झोपलो. 

शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे 
छायाचित्रकार - अक्षय मुळे






सुरुवात - पहिला दिवस

" आवडतो मज अफाट सागर , 
अथांग पाणी निळे, 
निळ्या जांभळ्या जळात केसर, 
सायंकाळी मिळे,
फेस फुलांचे सफेद शिंपित , 
वाटेवरती सडे ,  
हजार लाटा नाचत येती , 
गात किनार् या कडे. " 
आमच्या लहानपणी सहावीत असलेल्या  "सागर" ह्या  कुसुमाग्रजांच्या  कवितेचे यथार्थ दर्शन घडवणारा निळाशार समुद्र , स्वच्छ सुंदर किनारे लाभलेले गुहागर ( कोकण) डोळ्यात साठवून मन बस च्या पण वेगाने धावत होते. 
पाखरांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येणे मुंबईत जेवढे दुरापास्त तेवढेच इकडे सर्रास. त्यात बुलबुलचा आवाज , सुतार पक्ष्याचा आवाज आणि ह्यात मिसळणारा हूप हूप असा भारद्वाजाचा आवाज सकाळ अगदी प्रसन्न करत होते. त्यांची निवास व्यवस्थाच मुली अजब होती. काही जण मोठ्या जुन्या आंब्याच्या झाडावर , तर काही जण परसातल्या केळीवर , फणसाच्या झाडावर अगदीच काही चिमण्या आणि बुलबुल मधूनच जांब च्या झाडावर चक्कर मारत होते. अशी हिरवीगार सकाळ आत्तापर्यंत ऐकून ,वाचून होतो ती " याची देही याची डोळा " अनुभवताना एक चेतना रोमरोमात उभारून येत होती. याला हल्लीच्या भाषेत "मस्ती" म्हणतात. 
clicked from 2nd floor - House - Mr Khare

मुंबईतले पुढचे घाई गर्दीचे दिवस सुखात जावेत म्हणून आम्ही सगळेच ह्या मोकळ्या हवेचा श्वास निसर्गातून भरून घेत होतो.

युथ होस्टेल ने आयोजित केलेल्या आमच्या छोट्या सुट्टीची सुरुवात ठाणे ते गुहागर बस प्रवासाने झाली. कोकणातल्या चिंचोळ्या, नागमोडी रस्त्यांवरून धावणाऱ्या छोट्या बस मध्ये पाठ टेकायला जरी त्रास झाला तरी प्रसन्न सकाळ अनुभवून श्रम परिहार झाला. दोन्ही बस मिळून आम्ही ४०-४५ जण होतो. 
चहा पान आणि जेवण खाण जोशी काकून कडे होते. थोडा वेळ आराम करून गरम गरम उपमा खावून , चहा पिवून आम्ही समुद्राचे दर्शन घेण्य साठी पारस दारातून  निघालो. पुढे लावलेल्या जास्वंदी , तगर , मोगरा , जायफळ, माड, पोफळीच्या वाडी ने आमचे स्वागत केले.मधूनच खोल खोल असलेल्या विहिरी दिसत होत्या.
झाडीतून बाहेर येऊन पहिले असता समोर पसरलेला विशाल सागर आणि समुद्राची शुभ्र रेती , जसे जसे पुढे जाऊ तसे तसे रेतीतून बाहेर येणारे छोटे छोटे खेकडे माणसाना पाहून परत त्यांच्या मातीच्या घरात धावत होते.हौस पूर्ण होई पर्यंत पाण्यात डुबक्या मारल्या जात होत्या. किनार् या वरून दिसणारे निसर्गाचे दृश्य मी कॅमेरात कैद करून घेतले होते. परत येताने जवळचेच दुर्गा देवी चे मंदिर पहिले कोकणातल्या मंदिराचा रंग वर्ष्यानुवरशे टिकतो कारण प्रत्येक सण वारानुसार त्याला रंगाचा नवीन हाथ मारला जातो. मंदिराच्या आवारात लावलेली काही रंगीत फुले पाहून समाधान वाटले.  

जोशी काकून कडचे दुपारचे जेवण फारच सुंदर होते. त्यांच्या आग्रहाने जेवणाची गोडी आणखीन वाढली होती. साखर आंबा , कैरीची चटणी , ताक, गरम गरम पोळी भाजी, नारळाच्या दुधात बनवलेली कैरीची कढी, इतक खावून तृप्त ढेकर देत आम्ही थोडे विसावलो.तीन दिवसाच्या जोशी काकूंच्या आग्रहाला सलाम.  

अर्ध्यातासाच्या विश्रांती नंतर आमचा लवाजमा गोपाल गडावरच्या वरच्या  स्वारी साठी सज्ज झाला. गुहागरच्या उत्तरेला असलेला हा किल्ला आणि ह्याचे दगडी बुरुज आपली ओळख  टिकवून उभे आहेत. सागर तटाचे मनोहारी दृश्य ह्याच्या दोन्ही बाजूनी दिसते. पण हा किल्ला सरकार खजिन्यात नसून एका खासगी मालका कडे आहे. किल्ल्याच्या आत १ मोठी पाण्याची टाकी आहे . किल्ल्याकडे कूच करताना वाटेत दाभोळ वीज प्रकल्प दिसतो (एनर्ओंन). 
भ्रष्ट राजकारणात भारतच्या विकासाचाही काना कसा मोडतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
नंतर आमचा मोर्चा अंजनवेल मधल्या ताकालेश्वर लाईट हाउस  पाशी आला. हे लाईट हाउस उंच डोंगराच्या कडेला उंच चबुतरया वर बांधलेले आहे. ह्याच्या रचने मध्ये १० प्रिझम चे वर्तुळाकार तुकडे आहेत ज्यांच्या मुळे रात्रीच्या वेळी समुद्रातील जहाजांना दिशा दाखवता येते (सिग्नल देता येतो) . भौतिक शास्त्रातील "प्रकाशाचे परिवर्तन " हा सिद्धांत ह्या यंत्रासाठी वापरला आहे. भारत सरकारने दर ३० कि मी सागर तीरावर असे लाईट हाउस प्रस्थापित केले आहेत.

"माणूस जर एकलकोंडा  झाला तर त्याला जमावाची भीती वाटायला लागते आणि मग तो उद्धट वर्तन करतो "ह्याची प्रचीती इथल्या मशीन चालवणाऱ्या व्यक्ती वरून आली.
पहिल्या दिवसाचा आमच्या प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे धोपाव जेट्टी मार्गे दाभोळ च्या चंडिका मातेचे दर्शन. बच्चे कंपनीला प्रमुख आकर्षण होते ते फेरी बोट मधून प्रवास. जेट्टी च्या आसपास सार्वजनिक शौचालय हा प्रकार न्हवता. पर्यटन विकास मंत्रालयाला बहुतेक ते बांधण्यात काही रस नसावा किंवा पर्यटकांची गैरसोय त्यांची आवड असावी.(ह्याला कोकणचा विकास म्हणतात)
जेट्टी पर्यंत बस ने आल्यावर पुढे बस सकट सगळे जण फेरी बोट मध्ये बसलो. फेरी बोट च्या अर्ध्याभागात वाहन तळ असतो तर निम्म्या भागात दुमजली प्रवासी असने असतात. ७- ९ मिनिटाच्या प्रवासात पण आईस क्रीम विक्रेते आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेते होतेच. पलीकडे परत डोंगराळ भागातून बस ने प्रवास करून एकदाचे आम्ही एका मंदिरा पुढे उतरलो . मंदिराचे छप्पर पत्र्याचे होते.आत गेल्यावर सभागृह होते. आणि पुढे एक गुहा होती त्यात चंडिका मातेची स्वयंभू मूर्ती होती. संध्याकाळच्या समयांच्या प्रकाशात मूर्ती तेजस्वी भासत होती. दर्शन घेऊन मूर्तीच्या मागून बाहेर येता  येते. गुहेची उंची कमी असल्याने वाकूनच जावे लागते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी बऱ्याच नवसाच्या घंटा बांधलेल्या होत्या. परत फेरी बोट करून गुहागरला परतलो. रात्रीचे जेवण करून झाल्यावर निद्रा देवीच्या केव्हा अधीन झालो ते कळलेच नाही.

शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे
     छायाचित्रकार - कौस्तुभ देशपांडे