Tuesday, February 4, 2014

Polution Free Dombivali

डोंबिवली - गाव ते शहर (प्रगती का अधोगती) डोंबिवली , मुंबई उपनगारापासून जवळ असणारे गाव होते. १९९९ पर्यंत लोकवस्ती अशी जास्ती न्हवतीच. पण दादर , बोरीवली, मालाड , गिरगाव , दहिसर, वसई, ई ठिकाण हून लोक डोंबिवली मध्ये स्थलांतरित होऊ लागले आणि गावाचा प्रवास शहराकडे चालू झाला. विकास नुसता रस्त्यांचा , सोयी शुविधा ह्यांचा नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा झाला. शाळा ,कॉलेजेस, सामाजिक संस्था (ह्या सामाजिक संस्था आज स्वतःची तुंबडी भरण्यात अग्रेसर असतात , प्रमोशनअल इवेन्ट च्या नावा खाली ) पण उदयास आल्या. पण निवास हि संकल्पना गावात छोटेखानी कौलारू घर अशी होती. ती चौकट रुंदावून त्याची बिल्डिंग, कॉमप्लेक्स झालीत. डोंबिवली MIDC मध्ये पण कारखाने बंद पडून नवीन निवासी संकुल आले. वाडे आणि कौलारू घराच्या आसपास असलेली झाडी, फुलबाग , तारेचे सुशोभित कुंपण ( उदा. पणशीकर वाडा, समेळ बंगला, माटे बंगला) ह्या गोष्टीपण सिमेंटच्या जंगलात लुप्त झाल्यात. आणि २००३ पासून डोंबिवली हे "प्रदूषित शहर " अशी नवी ओळख लाभली. (http://www.facebook.com/topic.php?uid=170572606395&topic=12107) डोंबिवली च्या आस पास जवळ जवळ २७गाव आहेत त्यांचा परिसर सुंदर हिरवागार होता. २०१० पर्यंत पण त्या नंतर तिकडे मुंबई पुणे हायवे जवळ असल्याने मुंबईतील बडे बडे बिल्डर आपले हाथ पाय पसरू लागलेत. पर्यावरण रक्षण कर्त्यांचे डोंबिवली ते शीळ रस्त्यावर लक्ष्य नसावे असे वाटते. १९९७ पासून बंद असलेल्या प्रीमिअर कंपनीत असलेल्या गर्द झाडी मध्ये मुंगुस, घार, गिधाड ई. आणि बरेचसे सरपटणारे प्राणी ह्यांचा अधिवास आहे. २०१२ मध्ये झालेल्या हाय कोर्टाच्या निकालाप्रमाणे ती जागा आता शॉपिंग माल साठी देणार आहे म्हणजे तिथे असलेली वन संपदा नष्ट होणार आहे. ह्या गोष्टीनी डोंबिवलीचा विकास होतोय का ऱ्हास ? ते पक्षी , तिथली झाडे , विचारतायत कि कोण आहे का आम्हाला वाचवणारे ? सरकारने हा पूर्ण पत्ता भोपेर पासून ते शीळ , हाजीमलंग पर्यंतचा परिसर ग्रीन झोन जाहीर करून त्यात वनसंपदा , पक्षी विकास, केला पाहिजे. नवीन बिल्डर ला ह्या परिसरात कॉमप्लेकस बांधायाला परवानगी देऊ नये. तरच डोंबिवली मध्ये असलेले प्रदूषण ताब्यात राहायला मदत होईल. शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे

Indian Talent- How they can help to overcome Dearth

पानी तेरा रंग कैसा सध्या च्या काळात पाणी ही मूलभूत गरज ओलखुन सरकार ने बरेच विकास प्रकल्प राबवले आहेत . धरण बंधाणे अणि त्याची निगा रखाणे हयात सरकारला समन्वय सधता आलेला नाही. असे चित्र सोशल मीडिया दाखवते, हे खरेच आहे की सरकर बरीच कामे पूर्ण करत नाही अणि केली तर त्याची निगा रखत नाही. नुकताच टीवी वर एका न्यूज़ चनॆल वाल्याने दाखवले आहे की महाराष्ट्रात काही मोठ्या धारणा तुन पाणी गळती सुरु आहे . काही जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना सरकारला ली पाणी गळती दिसत नहीं का ? इथे मिडिया वाल्यानी स्वत:हुन काही एक्सपर्ट सिविल इंजिनियर च्या चर्चा किंवा मर्गदर्शन सरकारला केले पाहिजे, अन्यथा असल्या अर्धवट बातम्या दाखवून नयेत . मी विचारतो ह्या सोशल मीडिया वाल्याना आणि भारतातल्या सगळ्या सिविल इंजिनियर मित्राना की आपण ह्या वाया जाणार्या पाण्याचा दुष्काली भागाला उपयोग करता येण्याजोगा मार्ग सुचवावा . जेणे करून सरकार ला पण योग्य पावुल उचलण्याची दिशा मिळेल . नुसत्या आरोप प्रत्यारोपतुंन गरीब जनतेचे हालच होतील . माझ्या संपूर्ण भारतातील सिविल इंजिनियर मित्रानी आपणहून पुढे येउन आपले मत मांडावे . नोट :- हा लेख मी सामाजिक जबाबदारि ओळ्खुन लिहिला आहे . ह्या लेखाचा कुठल्याही राजकीय पक्ष्याशी संबंध नाही .

satyanarayan katha

सत्यनारायण कथा अलीकडेच एका वृत्तपत्रातून वाचनात आलेल्या सत्यानारायणा च्या कथे विषयी ले लिहिले होते त्या लेखा वर लिहावासे वाटले म्हणून लिहितोय. प्रस्तुत लेखका इतका मी मोठाही नाही आणि माझा अनुभवही नाही . एकुणच तय लेखात आलेला मजकुर " नविन पिढीचा सत्य नारायण कथे कड़े पहाण्याचा दृष्टिकोन , आणि कथा म्हणजे सत्य नारायणा ची जाहिरात आहे." असा होता असो , सत्यनारायण हे व्रत आहे. ते कसे पूर्ण करावे अणि त्याची फलश्रुती काय आहे,हे त्या कथे मधून श्रोत्याना मिळत असते . जाहिरात ही कुठल्याही चांगल्या गोष्टीची करावी लागत नाही . ती हॊत असते . वैदिक कालपासून मुखप्रचार हे माध्यम जाहिरातीं साठी वापरले जात होते . त्याचेच ही कथा म्हणजे उत्तम उदहारण आहे. कथा श्रवण केल्याने कानाला चांगले ऎइकण्य़ाचि सवय लगाते . ह्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर नसते ते स्थिर करण्याचा थोडा प्रयत्न ही कथा करत आलेली आहे. जसे संगीतातील ज्ञान गुरु वर श्रद्धा ठेवून पुढे संक्रमित होते. त्याच प्रमाणे ही कथा प्रत्येक पिढी ला आदर्श् च आहे. इथे श्रद्धा असणे हे महत्वाचे आहे . इश्वर तत्व सगळ्या चराचरात आहे असे मानले तर तो अलीकडच्या mobile , iphone , ipad इत्यादि गोष्टिन्मधे पण आहेच . ह्या मॉडर्न पिढी मधे पण सत्यानारायणाच्या कथे बद्दल श्रद्धा आहेच . पावित्र्य आणि साक्षात्कार ह्या गोष्टी जुन्या पिढी पेक्ष्या कमी असतील कदाचित पण श्रद्धा अली की त्यात सर्व विरघ ळु न जाते. जे काही अत्ता ह्या घडीला चालू अहे ही त्याचीच इच्छा आहे. नविन शोध लगणया ( मोबाइल, लैपटॉप , आईपॉड ,ipad इत्यादि )पासून ते त्याचा वापर कुणी कसा करावा इथपर्यंत . श्रद्धा आणि संस्कार ह्याचे महत्त्व प्रत्येक पिढीला कळावे म्हणून संत महात्मे इथे जन्माला आले . उदाहरानादाखाल स्वामी विवेकानंद - इन्ग्रंजच्या अधिपत्याखाली सगळा देश भारतीय परंपरा विसरत होता . त्याचा पुन:प्रचार करण्याचे मोठे कार्य त्यानी केले. तरुण पिढितिल सगळे जण उत्तम संस्कारित राहतील ह्याची काळजी घेतली . laptop , mobile मुळे जरी जुन्य पिढितिल लोकाना सत्यनारयणाच्या पूजेत वातावरण निर्मिती चा आभाव भासला तरी , साधकाची श्रद्धा इश्वारापर्यंत पोचलेली असते . समाप्त .