Tuesday, February 4, 2014

Polution Free Dombivali

डोंबिवली - गाव ते शहर (प्रगती का अधोगती) डोंबिवली , मुंबई उपनगारापासून जवळ असणारे गाव होते. १९९९ पर्यंत लोकवस्ती अशी जास्ती न्हवतीच. पण दादर , बोरीवली, मालाड , गिरगाव , दहिसर, वसई, ई ठिकाण हून लोक डोंबिवली मध्ये स्थलांतरित होऊ लागले आणि गावाचा प्रवास शहराकडे चालू झाला. विकास नुसता रस्त्यांचा , सोयी शुविधा ह्यांचा नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा झाला. शाळा ,कॉलेजेस, सामाजिक संस्था (ह्या सामाजिक संस्था आज स्वतःची तुंबडी भरण्यात अग्रेसर असतात , प्रमोशनअल इवेन्ट च्या नावा खाली ) पण उदयास आल्या. पण निवास हि संकल्पना गावात छोटेखानी कौलारू घर अशी होती. ती चौकट रुंदावून त्याची बिल्डिंग, कॉमप्लेक्स झालीत. डोंबिवली MIDC मध्ये पण कारखाने बंद पडून नवीन निवासी संकुल आले. वाडे आणि कौलारू घराच्या आसपास असलेली झाडी, फुलबाग , तारेचे सुशोभित कुंपण ( उदा. पणशीकर वाडा, समेळ बंगला, माटे बंगला) ह्या गोष्टीपण सिमेंटच्या जंगलात लुप्त झाल्यात. आणि २००३ पासून डोंबिवली हे "प्रदूषित शहर " अशी नवी ओळख लाभली. (http://www.facebook.com/topic.php?uid=170572606395&topic=12107) डोंबिवली च्या आस पास जवळ जवळ २७गाव आहेत त्यांचा परिसर सुंदर हिरवागार होता. २०१० पर्यंत पण त्या नंतर तिकडे मुंबई पुणे हायवे जवळ असल्याने मुंबईतील बडे बडे बिल्डर आपले हाथ पाय पसरू लागलेत. पर्यावरण रक्षण कर्त्यांचे डोंबिवली ते शीळ रस्त्यावर लक्ष्य नसावे असे वाटते. १९९७ पासून बंद असलेल्या प्रीमिअर कंपनीत असलेल्या गर्द झाडी मध्ये मुंगुस, घार, गिधाड ई. आणि बरेचसे सरपटणारे प्राणी ह्यांचा अधिवास आहे. २०१२ मध्ये झालेल्या हाय कोर्टाच्या निकालाप्रमाणे ती जागा आता शॉपिंग माल साठी देणार आहे म्हणजे तिथे असलेली वन संपदा नष्ट होणार आहे. ह्या गोष्टीनी डोंबिवलीचा विकास होतोय का ऱ्हास ? ते पक्षी , तिथली झाडे , विचारतायत कि कोण आहे का आम्हाला वाचवणारे ? सरकारने हा पूर्ण पत्ता भोपेर पासून ते शीळ , हाजीमलंग पर्यंतचा परिसर ग्रीन झोन जाहीर करून त्यात वनसंपदा , पक्षी विकास, केला पाहिजे. नवीन बिल्डर ला ह्या परिसरात कॉमप्लेकस बांधायाला परवानगी देऊ नये. तरच डोंबिवली मध्ये असलेले प्रदूषण ताब्यात राहायला मदत होईल. शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे

No comments:

Post a Comment